पावसाळा निबंध मराठी सुंदर वर्णन | Essay on Rainy Season in Marathi.

Pavsala Marathi nibandh / पावसाळा मराठी निबंध.

आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध असे तीन ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा, व हिवाळा पण मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. या ऋतूमध्ये पाऊस भरपूर असतो. रिमझिम पाऊस पडत असतो. पावसात नाचत बसायला, खेळायला, एकमेकांच्या अंगावरती पावसाचे पाणी उडवायला खूप आनंद होतो.

Essay on Rainy Season in Marathi
short essay on pavsala in Marathi

पाऊस पडत असताना छोटे छोटे तळे तयार होतात, त्यामध्ये उड्या मारायच्या अशा खूप गोष्टी पावसाळ्यात करता येतात. पाण्याच्या तळ्यामध्ये कागदाची जहाज बनवून खेळ खेळणं हा एक निराळाच आनंद आहे. पाउसाळयामध्ये टिपटिप अंगावरती पडणारे पाणी एक सुखद, थंडगार आनंद देते.

मानवी जीवनात पाण्याला खूप महत्व आहे. भरपूर पाणी आपल्याला फक्त पाउसाळ्यात मिळते. उन्हाळा सुरू झाला की पाउसाची प्रत्येक जण वाट पाहू लागतो. कधी एकदाशी पाऊस येतोय आणि हा अंगाची राख करणारा उन्हाळा निघून जातोय अस लोकांना वाटत असत.

पावसाळ्यामध्ये पर्यटक निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतात. धबधबा पाहण्यासाठी, नदीचे पाणी पाहण्यासाठी पर्यटक खूप लांबून प्रवास करून येतात व अशा सुंदर निसर्गरम्य ठिकाणांना भेट देतात.

Essay on Rainy Season in Marathi
Essay on Rainy Season in Marathi, pavsala Marathi nibandh.

पावसाळ्यातील पहिल्या पावसाची आठवण वर्षभर राहते कारण पावसाळ्यातील पहिल्या पावसामुळे मातीचा येणारा सुगंध अगदी मोहक असतो. पावसाळा सुरू होताच आणि पावसाच्या सरी कोसळू लागताच पक्षांची, पाखरांची आपल्या घरट्याकडे निघण्यासाठी धावपळ सुरू होते.

कामानिम्मीत घराबाहेर असणारे लोकांची तर तारांबळ उठते. पावसामध्ये आपण भिजू नये म्हणून आडोसा शोधण्यासाठी लोक सैरावैरा धावतात. जर भरपूर पाऊस झाला तर पावसाळ्यामध्ये आमच्या शाळेला सुट्टी असते, आणि पुन्हा पाऊस कमी झाला की पुन्हा शाळा सुरू होते. मग शाळेत जाताना आई माझ्या सोबत रेनकोट, छत्री देते आणि दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी गरम गरम खाद्य पदार्थ देते.

Essay on Rainy Season in Marathi

पावसाळा चालू झाला की आई घरामध्ये गरम चहा आणि भजी बनवायला घ्यायची आणि गरम गरम चहा भजी आम्हाला खाण्यास द्यायची, तेव्हा आम्ही घरातले सर्वजण आईच्या हाताच्या चवीचा आनंद त्या रिमझिम पडणार्‍या पाउसामध्ये घेत असायचो. आईच्या हाताला चव असल्यामुळे पावसाळ्यामध्ये चहा आणि भजी पण खूप स्वादिष्ट लागायचे.

शेतकऱ्यांसाठी पाऊस हा खूप मोठा महत्वाचा घटक आहे. शेतकरी पिकवतात म्हणून आपण खाऊ शकतो म्हणून पाण्याशिवाय काहीच नाही. पाउस आला की आम्ही सर्व मुले तर नुसती पावसामध्ये भिजत असतो. घरी जाऊन आईचा ओरडा खातो पण तरीही मौज मस्ती चालुच असते. मला पावसाळा खूप आवडतो. सगळीकडे झाडे हिरव्या रंगांनी लाल निळ्या पांढर्‍या फुलांनी भरलेली असतात.

शेतकऱ्यांसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते. पाऊस झाला की शेतीमध्ये पाणी खूप यायचे. पाऊस पडला की शेतकर्‍यांना खूप आनंद होई. पाऊस झाला की झाडांना वेलींना पालव्या फुटतात आणि सगळीकडे नुसती हिरवळ पसरते.  सगळीकडे पूर्णपणे हिरवळ आलेली असते.

pavsala marathi nibandh

पाऊस झाला की शेतामध्ये फिरावयास जाण्याची मज्जाच काही और असते, सगळीकडे पाणीच पाणी साठलेले असते. नाले, तलाव, डबके, आणि ओढे अगदी तुडुंब पाण्याने भरलेली असतात. पाण्याने भरलेल्या डबक्यामध्ये छोट छोटे दगड टाकायला खूप मज्जा येते आणि पाण्यात टाकलेल्या दगडामुळे पाण्यात तयार होणारी गोल वलये खूप छान दिसतात.

आंब्याची झाडे बहरतात काही फळ झाडांना तर पाड लागायला सुरुवात होते. शेतकऱ्यांची पावसामुळे चांदी होते. काही भागांमध्ये तेथील हवामानाला पुरक अशी पिके पाऊसाळ्या मध्ये घेतली जातात, जास्त पाउसाच्या भागामध्ये भात लावणी, उस लावणी केली जाते, बाग लावणी, फळ झाडे लावणी अशी अनेक निरनिराळी पिके लावली जातात.

सगळीकडे हिरवळ असते, मन प्रसन्न वाटत असते. पाऊस आला की आम्ही गाणी म्हणतो, अंताक्षरी खेळतो, पावसामध्ये नाचत असतो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतो.

तो पावसाळा संपला की आम्हाला खूप पावसाची आठवण येते म्हणून आम्ही मोठ्या आनंदाने म्हणतो, “तू येरे येरे पावसा तुला देतो पैसा!” “पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा!”

सूचना: जर तुम्हाला “Essay on Rainy Season in Marathi, pavsala marathi nibandh.” हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत सोशल मीडिया वर नक्की शेयर करा.

Leave a Comment